Narayan Rane : नारायण राणे यांचं कणकवलीतील युती आणि राज्याच्या विकासावर मोठं भाष्य; राणे म्हणाले उद्धव ठाकरेंशी...

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय आणि विकासकामांच्या स्थितीवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही गटाशी युती होण्याची शक्यता साफ नाकारली. राजकीय भूमिकेबरोबरच राणे यांनी जमीन घोटाळ्यांच्या मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, राज्यातील जमीन घोटाळ्यांवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.


याबद्दल बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. राणे म्हणाले, "मुख्यमंत्री या गंभीर विषयावर योग्य निर्णय घेतील आणि दोषींवर निश्चितच कठोर कारवाई होईल, अशी माझी अपेक्षा आहे."



सिंधुदुर्ग विमानतळ आणि कोकण रेल्वेवर भाष्य


यावेळी त्यांनी विविध विकास प्रकल्पांविषयी माहिती दिली. सिंधुदुर्ग येथील विमानतळाच्या कामासाठी त्यांनी केंद्रातून निधीची व्यवस्था केल्याचे सांगितले. या कामांसाठी केंद्रीय मंत्र्यांकडून मदत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. राणे यांची इच्छा आहे की, लवकरच इंडिगो एअरलाइनने या विमानतळावरून आपली सेवा सुरू करावी. कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणींवर बोलताना राणे यांनी महाराष्ट्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, "कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणींमुळे काम थांबले आहे. जर महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत केली, तर हे काम त्वरित पूर्ण होईल." स्थानिक समस्यांवर बोलताना त्यांनी रुग्णवाहिकांच्या संदर्भात एक महत्त्वाचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी, रुग्णवाहिकांसाठी लागणाऱ्या पेट्रोलची व्यवस्था केली जाईल. राजकीय परिस्थितीचा अंदाज व्यक्त करताना, राणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असे ठाम भाकीत केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन; वरळी डोममध्ये भव्य कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र

Nashik : मालेगावात अत्याधुनिक भूकंप मापक केंद्र सुरू

Nashik : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने होणारे भूकंपाचे धक्के चिंतेची बाब ठरत आहे,

Amit Shah : ‘संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार’, पण...; गृहमंत्री अमित शाहांचा विरोधकांना टोला

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Jalgaon Crime : रस्त्यावर मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ

Jalgaon Crime : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात मंगळवारी धाकादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे