Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन जाणाऱ्या एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील सर्व २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर किंवा तांत्रिक कारणामुळे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या सर्व २२ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, चालक दारूच्या नशेत होता का किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.



बस झाडावर आदळली अन्...


मिळालेल्या माहितीनुसार, निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर धडकवली. बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी, १ केअर टेकर आणि चालक होता. अपघातानंतर जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत दिलासादायक बाब समोर आली आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक अधिक संतप्त झाले आहेत. शालेय वाहतुकीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पालकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, चालकाच्या निष्काळजीपणामुळे की बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, या प्रकरणाची गहन चौकशी पोलीस करत आहेत. हा अपघात मोठा होता होता टळला असला तरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य