Bhandara Accident News : भंडारा हादरले! - २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा भीषण अपघात; २२ विद्यार्थी जखमी

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. २२ शालेय विद्यार्थ्यांना (School Bus Accident) घेऊन जाणाऱ्या एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बसमधील सर्व २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर किंवा तांत्रिक कारणामुळे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या सर्व २२ विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून, सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, चालक दारूच्या नशेत होता का किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.



बस झाडावर आदळली अन्...


मिळालेल्या माहितीनुसार, निलज फाटा येथे येताच बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेच्या झाडावर धडकवली. बसमध्ये एकूण २२ विद्यार्थी, १ केअर टेकर आणि चालक होता. अपघातानंतर जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत दिलासादायक बाब समोर आली आहे. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक अधिक संतप्त झाले आहेत. शालेय वाहतुकीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर पालकांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, चालकाच्या निष्काळजीपणामुळे की बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, या प्रकरणाची गहन चौकशी पोलीस करत आहेत. हा अपघात मोठा होता होता टळला असला तरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा आणि प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली