Buldhana Horror : बुलढाण्यात थरार! मुलाने कुऱ्हाडीने आई-वडिलांची हत्या करून स्वतःही संपवले जीवन, २ चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला

बुलढाणा : नात्यांना काळीमा फासणारी एक हादरवणारी आणि हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. शेतीच्या वादातून एका मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव डुकरे येथील एका कुटुंबात शेतीच्या तुकड्यावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुलगा दारूच्या नशेत घरी आला. त्याने याच वादातून आपल्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. वार इतके क्रूर होते की आई आणि वडिलांचा जागीच मृत्यू झाला. जन्मदात्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर, या कृत्याच्या धक्क्याने किंवा पश्चात्तापाने त्याने घरामध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



व्यसनाच्या विळख्याने घडवले तिहेरी हत्याकांड


अत्यंत शांत आणि साधे म्हणून ओळखले जाणारे चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे हे गाव गुरुवारी रात्री एका भीषण तिहेरी हत्याकांडाने हादरले. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचे अस्तित्वच एका क्षणात संपले आहे. या हादरवून टाकणाऱ्या घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७) आणि आई लता सुभाष डुकरे (५५) यांची निर्घृण हत्या झाली आहे, तर आरोपी मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) याने स्वतः गळफास घेऊन आपले जीवन संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण कृत्यामागे विशाल डुकरेचे दारूचे व्यसन हेच मूळ कारण होते. विशालला दारूचे व्यसन जडल्यापासून घरात वारंवार वाद आणि भांडणे होत होती. या व्यसनाने कुटुंबाची शांतता हिरावून घेतली होती. गावकरी सांगतात की, विशाल लहानपणी अत्यंत हुशार आणि शाळेत पहिला येणारा विद्यार्थी होता. मात्र, हळूहळू तो दारूच्या नादी लागून बिघडत गेला. कामधंदा सोडून तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा. आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणे हे त्याचे रोजचे झाले होते. व्यसनाच्या या विळख्यामुळे त्याचे लग्न मोडले, मित्र दूर झाले आणि कुटुंबातील शांतता कायमची हरपली. अखेर दारूच्या नशेतच त्याने कुऱ्हाडीने वार करत जन्मदात्यांची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चिखली घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकून कुटुंबाचे झालेले हे भीषण हत्याकांड संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे.



चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला


या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही वेळातच पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अमोल गायकवाड आणि सुधीर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक टीमने तातडीने तपासणी सुरू केली आहे. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे. या संपूर्ण घटनेतील एक दिलासा देणारी बाजू समोर आली आहे, ती म्हणजे मृतांच्या कुटुंबातील दोन लहान मुले सुदैवाने वाचली. मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा ११ वर्षांचा मुलगा युवराज आणि ६ वर्षांची मुलगी आर्या, हे दोघेही 'त्या' रात्री घरी नव्हते. गावात बोलले जाते की, या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांवर (सुभाष आणि लता) खूप लळा होता आणि ते रोज रात्री त्यांच्याकडेच झोपायला जात असत. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजी-आजोबांकडे गेले नव्हते. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे त्यांच्यावरील मोठे संकट टळले आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेमुळे सावरगाव डुकरे गावात खोलवर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या