जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

खासदार श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार


बुलढाणा  : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली आहे. हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट टीका केली आहे.


राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पर्यटकांना माहिती व सुविधा देण्यात येणार आहे. शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र उभारण्याला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. हे केंद्र फोडून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्याचवरून आता श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.


राज ठाकरे यांच्यावर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून काहीही चांगले झाले नाही. हे लोक काही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय? गडकिल्ल्यावर पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी ते केंद्र सुरू करण्यात येत आहे. गडकिल्ल्यांचे किंवा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम महायुतीने केले. त्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात. मात्र कधीकाळी यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते.’


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘लोकांना कोण खरे, कोण खोटे, कोण देणार आहे, कोण घेणार आहे. हे सगळे माहीत असते. आता अतिवृष्टी झाली, त्यावेळेस महायुती सरकारने ३८ हजार कोटींचे पॅकेज दिले. ज्या वेळेस आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटायला गेले तर त्यांनी काही ना काही सोबत नेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे शेतकरी यांच्या दौऱ्याकडे पाठ
फिरवत आहेत.’


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘आम्ही लोकसभेची व विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रयत्न महायुतीचा असेल, जिथे कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना असतील त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील.’

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार