बिहार मतदान: लोकशाहीच्या उत्सवाचा आज पहिला टप्पा, मतदान करण्यासाठी मोदींनी केले आवाहन!

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.


बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन दिले आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझे आवाहन आहे की त्यांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावे. या प्रसंगी, राज्यातील सर्व तरुण मतदारांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत..."


बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी एकूण ४५ हजार ३४१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ३६ हजार ७३३ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात १०.७२ लाख नवीन मतदार आहेत. ज्यात १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ७.३८ लाख एवढी आहे.





निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.

Comments
Add Comment

Budget 2026-27 : तब्बल १५० ठिकाणी पत्रकार परिषदा, सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्सशी संवाद; 'या' आहेत भाजपच्या अर्थसंकल्पासाठीच्या योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात सुरू केलेल्या

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून

रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये

अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली

पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणार नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)