बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागा आहेत.



तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमदेवारांचे चेहरे बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. यात सर्वात महत्त्वाची जागा राघोपूर आहे. राघोपूर येथे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या सतीश कुमार यादवांचे आव्हान आहे.



मोकामा मतदारसंघ ही सर्वाधिक चर्चेत असलेली दुसरी महत्त्वाची जागा आहे. दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीच्या राजकीय संघर्षाचे केंद्र झाला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अनंत सिंह आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्यात लढत आहे.



तारापूर मतदारसंघात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरजेडीचे अरुण कुमार यांच्यात सामना आहे. ही जागा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.



महुआ मतदारसंघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, आरजेडीचे मुकेश कुमार रोशन आणि लोक जनशक्ती पक्षाचे संजय सिंह यांच्यात चुरस होणार आहे.



तर पाचवा मतदारसंघ आहे अलीनगर. या ठिकाणी पहिल्यांदाच लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजकारणातल्या अनुभवात नवीन असून थेट विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे मैथिली ठाकूर चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यासमोर आरजेडीचे विनोद मिश्रा यांचे आव्हान आहे.

Comments
Add Comment

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत