बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागा आहेत.



तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमदेवारांचे चेहरे बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. यात सर्वात महत्त्वाची जागा राघोपूर आहे. राघोपूर येथे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या सतीश कुमार यादवांचे आव्हान आहे.



मोकामा मतदारसंघ ही सर्वाधिक चर्चेत असलेली दुसरी महत्त्वाची जागा आहे. दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीच्या राजकीय संघर्षाचे केंद्र झाला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अनंत सिंह आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्यात लढत आहे.



तारापूर मतदारसंघात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरजेडीचे अरुण कुमार यांच्यात सामना आहे. ही जागा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.



महुआ मतदारसंघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, आरजेडीचे मुकेश कुमार रोशन आणि लोक जनशक्ती पक्षाचे संजय सिंह यांच्यात चुरस होणार आहे.



तर पाचवा मतदारसंघ आहे अलीनगर. या ठिकाणी पहिल्यांदाच लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजकारणातल्या अनुभवात नवीन असून थेट विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे मैथिली ठाकूर चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यासमोर आरजेडीचे विनोद मिश्रा यांचे आव्हान आहे.

Comments
Add Comment

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २०२६ या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक

आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना पोटगी नाकारता येणार नाही

मुंबई : केवळ उत्पन्न मिळविण्यास सक्षम आहे किंवा अधूनमधून काम करते म्हणून महिलेला तिच्या पतीकडून पोटगी नाकारता

एच-१ बी व्हिसात फसवणूक : एकट्या चेन्नईत २.२ लाख व्हिसा

भारतासाठी फक्त ८५ हजार निश्चित वॉशिंग्टन डीसी  : अमेरिकेच्या एच-१बी व्हिसा कार्यक्रमावरून एक नवीन वाद सुरू झाला

राम मंदिर ध्वजारोहणावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले

इस्लामोफोबिया वाढल्याची पाककडून टीका नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील

सैनिकांच्या कमतरतेमुळे लष्करात अग्निवीरांची ‘घाऊक’ भरती

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याने लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा

अखेर तो ऐतिहासिक क्षण आलाच... मंदिर शिखरावर धर्म ध्वज फडकला अन् हिंदुचे स्वप्न साकार!

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात आज ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला