अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले आहेत. हा व्यवहार १२ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याचा अर्थ, मागील १३ वर्षांत त्यांना या व्यवहारात सुमारे ४७% बंपर नफा मिळाला आहे. हे दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव ईस्ट येथील ओबेरॉय एक्सक्विझिट बिल्डिंगच्या ४७ व्या मजल्यावर होते.


पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठी ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी (रजिस्ट्रेशन फीस) लागली. हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दुसरा फ्लॅट ममता सूरजदेव शुक्ला यांनी देखील ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठीही तेवढीच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी लागली. हा करार १ नोव्हेंबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दोन्ही फ्लॅट्ससोबत चार कार पार्किंगची जागा देखील विकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bmc News : वांद्र्यातील नवपाडा, घासबाजारमधील तुंबणाऱ्या पाण्याचा मार्ग मोकळा

दक्ष सहायक आयुक्तांमुळे रेल्वेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई मुंबई : मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात

BMC : महापालिका आयुक्त तपासणार आता प्रत्येक अधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला गती देतानाच

gig worker : गिग आणि डिलिव्हरी कामगारांची सक्त पडताळणी

मुंबई : महाराष्ट्रातील स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीटसारख्या असंख्य ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या आणि

crop registration : प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता

anna bhau sathe : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला गती देण्याचे निर्देश

मुंबई : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्किट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून