अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले आहेत. हा व्यवहार १२ कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स २०१२ मध्ये ८.१२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. याचा अर्थ, मागील १३ वर्षांत त्यांना या व्यवहारात सुमारे ४७% बंपर नफा मिळाला आहे. हे दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव ईस्ट येथील ओबेरॉय एक्सक्विझिट बिल्डिंगच्या ४७ व्या मजल्यावर होते.


पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठी ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी फी (रजिस्ट्रेशन फीस) लागली. हा व्यवहार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दुसरा फ्लॅट ममता सूरजदेव शुक्ला यांनी देखील ६ कोटी रुपयांना खरेदी केला. यासाठीही तेवढीच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी लागली. हा करार १ नोव्हेंबर २०२५ रोजी रजिस्टर झाला. दोन्ही फ्लॅट्ससोबत चार कार पार्किंगची जागा देखील विकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

माजी मंत्री माणिकराव कोकाटेंवर होणार अँजिओग्राफी, सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई: बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची

ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराचा दुरान्वयेही संबंध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Navnath Ban : "सामनाचे भाकीत म्हणजे गणपत वाण्याची माडी!" अमेरिकन फायलींवरून पंतप्रधान बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवनाथ बन यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख

Ashish Shelar : "काँग्रेसने मारली लाथ, आता राष्ट्रवादीचे धरले..." उबाठा सेनेच्या माहिती पुस्तिकेवर आशिष शेलारांचा खोचक टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा शिगेला

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची निवडणुकीनंतर होणार डागडुजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अनेक कठडे आणि बेंचेस तुटलेल्या अवस्थेत असून

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या चार नगरसेवकांचे काय होणार?

आरक्षणामुळे वॉर्ड गेले, आता पुनर्वसन करायचे कुठे? पक्षापुढे पेच! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या