लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, अद्याप अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. काहींना तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नव्हतं.


या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसीसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आणखी काही दिवसांची मुभा मिळाली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये लवकरच १५०० रुपयांचा निधी जमा होणार आहे.


अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या महिलांकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून अशा महिलांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते.

Comments
Add Comment

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण