शिंदेंच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने झिडकारली

संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यात 'सिटिंग-गेटिंग'वरून जुंपली!


बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मात्र महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये थेट खडाजंगी सुरू झाल्याचे चित्र आहे. चिखलीचे 'दबंग' आमदार संजय गायकवाड यांनी थेट बुलढाणा भाजपला 'ऑफर' दिली, पण जिल्हाध्यक्षांनी ती धुडकावून लावली.


चिखलीचे आमदार संजय गायकवाड यांनी जाहीरपणे मागणी केली की, 'चिखलीचे महापौरपद शिवसेनेला द्यावे, त्या बदल्यात बुलढाणा तुम्ही घ्या'. ही ऑफर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ताबडतोब धुडकावून लावली, कारण मागील वेळी चिखली पालिकेवर भाजपचाच महापौर होता.


आमदार गायकवाड यांनी भाजपच्या नेत्यांना स्पष्ट सुनावले की, 'बुलडाणा जिल्ह्यात कोणाचीही मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही. महायुती करायची असेल, तर सन्मानजनक जागा सोडव्या लागतील.' संजय गायकवाड यांचा स्वभाव बघता, बुलढाण्यात महायुती होणे कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.


गायकवाड यांच्या ऑफरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी थेट सवाल केला, "बुलढाणा कोणाला सोडायचे, याचा अधिकार आमदार गायकवाड यांना कोणी दिला?" शिंदे यांनी महायुतीचा ठरलेला फॉर्म्युला सांगितला. 'सिटिंग-गेटिंग' (म्हणजे ज्या पक्षाकडे मागील निवडणुकीत पद होते, ते त्यालाच मिळणार). चिखली पालिकेत भाजपचा महापौर होता, त्यामुळे चिखली मागण्याचा अधिकार शिवसेनेला नाही आणि ती जागा भाजपच लढणार आहे. 'बुलढाणा कोणाला सोडायचे यावर चर्चा होऊ शकते, कारण तेथे दोघांचाही (भाजप-शिवसेना) महापौर नव्हता,' असे शिंदे यांनी स्पष्ट केले.


विजयराज शिंदे यांनी सांगितले की, 'आम्ही महायुतीत लढण्यास तयार आहोत, पण शिंदे सेनेचे आमदार अवाजवी मागणी करत आहेत आणि आधीपासूनच दावे करीत आहेत. यामुळे महायुतीत अडचण निर्माण झाली आहे.' आमदार गायकवाड हे आपल्या दबंग स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध