८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन!


नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने अखेर ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेला औपचारिक मंजुरी दिली. यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली. हा आयोग पुढील १८ महिन्यांत सध्याची वेतन रचना, भत्ते आणि आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारसी सादर करणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी 'उलथापालथ' होण्याची शक्यता आहे.


या महत्त्वाच्या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. नवी दिल्ली येथे आयोगाचे मुख्यालय असेल. ही तीन सदस्यांची टीम पुढील दीड वर्ष केंद्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे भविष्य निश्चित करणार आहे.



'परफॉर्मन्स बेस्ड' वेतनावर मुख्य भर


या वेतन आयोगाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे "परफॉर्मन्स बेस्ड वेतन" (Performance Based Pay) या संकल्पनेवर असणार आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, यापुढे कर्मचाऱ्याला केवळ सेवाज्येष्ठतेनुसार नाही, तर त्यांच्या 'कामकाजाच्या' (Performance) आधारावर आर्थिक लाभ मिळू शकतो.


जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल, त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी हा आयोग काम करणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट नमूद केले आहे.


या आयोगाच्या कक्षेत केवळ केंद्र सरकारी कर्मचारीच नाही, तर संरक्षण दलाचे सदस्य, अखिल भारतीय सेवा अधिकारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी, तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. आयोग जुने आणि कालबाह्य झालेले भत्ते रद्द करण्याच्या शिफारसीदेखील करू शकतो.



पेन्शन आणि ग्रॅच्युटीमध्येही बदल?


नवीन वेतन आयोगाकडून पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमांविषयीही सविस्तर शिफारसी अपेक्षित आहेत. विशेषतः, नवीन पेन्शन योजने (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'डेथ-कम-रिटायरमेंट ग्रॅच्युटी'च्या तरतुदींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, जुनी पेन्शन योजना (OPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियमांमधील आवश्यक सुधारणा सुचवण्याची शक्यता आहे.


या आयोगाच्या शिफारसी देशाची आर्थिक स्थिती आणि राज्यांच्या वित्तीय क्षमतेचा विचार करून केल्या जातील, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे