८वा वेतन आयोग मंजूर पण सरकारी कर्मचारी धास्तावले; कारण काय?

केंद्राचा मोठा निर्णय: पगारवाढीऐवजी आता 'कामकाजावर' वेतन!


नवी दिल्ली : देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने अखेर ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेला औपचारिक मंजुरी दिली. यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली. हा आयोग पुढील १८ महिन्यांत सध्याची वेतन रचना, भत्ते आणि आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारसी सादर करणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी 'उलथापालथ' होण्याची शक्यता आहे.


या महत्त्वाच्या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. नवी दिल्ली येथे आयोगाचे मुख्यालय असेल. ही तीन सदस्यांची टीम पुढील दीड वर्ष केंद्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे भविष्य निश्चित करणार आहे.



'परफॉर्मन्स बेस्ड' वेतनावर मुख्य भर


या वेतन आयोगाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे "परफॉर्मन्स बेस्ड वेतन" (Performance Based Pay) या संकल्पनेवर असणार आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, यापुढे कर्मचाऱ्याला केवळ सेवाज्येष्ठतेनुसार नाही, तर त्यांच्या 'कामकाजाच्या' (Performance) आधारावर आर्थिक लाभ मिळू शकतो.


जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल, त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी हा आयोग काम करणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट नमूद केले आहे.


या आयोगाच्या कक्षेत केवळ केंद्र सरकारी कर्मचारीच नाही, तर संरक्षण दलाचे सदस्य, अखिल भारतीय सेवा अधिकारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, लेखापरीक्षण विभागाचे अधिकारी, तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. आयोग जुने आणि कालबाह्य झालेले भत्ते रद्द करण्याच्या शिफारसीदेखील करू शकतो.



पेन्शन आणि ग्रॅच्युटीमध्येही बदल?


नवीन वेतन आयोगाकडून पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या नियमांविषयीही सविस्तर शिफारसी अपेक्षित आहेत. विशेषतः, नवीन पेन्शन योजने (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 'डेथ-कम-रिटायरमेंट ग्रॅच्युटी'च्या तरतुदींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, जुनी पेन्शन योजना (OPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियमांमधील आवश्यक सुधारणा सुचवण्याची शक्यता आहे.


या आयोगाच्या शिफारसी देशाची आर्थिक स्थिती आणि राज्यांच्या वित्तीय क्षमतेचा विचार करून केल्या जातील, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो.

Comments
Add Comment

किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या

प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्लील फोटो, Video पाठवून मानसिक त्रास, आरोपीला अटक, काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : प्रख्यात टीव्ही अभिनेत्रीला फेसबुकवर वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याबद्दल ऑनलाइन छळाची

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा