जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि प्रशिक्षण करणे ही अतिशय महत्त्वाची कामं केली त प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी. अंतिम सामन्याच्या दिवशीही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करा आणि उत्तम खेळ करा. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा अशा स्वरुपाचं मार्गदर्शन मुझुमदार यांनी टीमला केलं. प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा हा गुरुमंत्र टीम इंडियासाठी लाभदायी ठरला. भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला.


भारताच्या जगज्जेतेपदात अमोल मुझुमदार यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही भूमिका चोख बजावल्यानंतर सोमवारी ३ नोव्हेंबरच्या रात्री अमोल मुझुमदार त्यांच्या विलेपार्ले येथील घरी परतले. यावेळी त्यांचे घर ज्या सोसायटीत आहे तिथल्या रहिवाशांनी अमोल मुझुमदार यांचे जोरदार स्वागत केले. भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यामागे मुझुमदार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता त्यांच्या शेजाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी मुझुमदार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.




माध्यमांसोबत संवाद साधताना अमोल मुझुमदार म्हणाले की, 'हे सारे अविश्वसनीय आहे! या जगज्जेतेपदाची विलक्षण अनुभूती समजायला थोडा वेळ जाईल.' तसेच या जगज्जेतेपदाची तुलना त्यांनी १९८३ च्या वर्ल्ड कप यशासह केली. त्या जेतेपदाने जशी भारतीय तरुणांना क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा दिली, तशीच स्फूर्ती या विश्वचषकामुळे महिलांमध्ये येईल, असे ते म्हणाले. खेळाडूंविषयी बोलताना ते म्हणाले की, 'मी आणि हरमन खूप चर्चा वगैरे करत नाही. पण स्मृतीसह फलंदाजी, नियोजन याबद्दल खूप संवाद होतो. कामाबद्दल हरमनसोबत समन्वय आहेच. प्रशिक्षक आणि कर्णधाराचे नाते असेच असावे. त्यांच्यात मतभिन्नता नसावी. माझे आणि हरमनचे नेहमीच एकमत असते.'


महत्त्वाचे म्हणजे अमोल मुझुमदार विशेष परवानगी घेऊन घरी आले आहे. त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती माध्यमांना दिली. विशेष परवानगी घेऊन घरचे जेवण खाण्यासाठी घरी आल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवस बाहेर असल्यामुळे घरच्या जेवणाची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या पत्नीला जेवणात खास वरण भात आणि फिश फ्राय करायला सांगितल्याचेही ते म्हणाले. घरचा वरण भात आणि फिश फ्राय हे अतिशय आवडीचे पदार्थ असल्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले.

Comments
Add Comment

तिलक वर्मा चमकला, मुंबईने सामना जिंकला; पंजाबचा पाचवा पराभव

धरमशाला : आयपीएल २०२६ मधील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर ६ गडी

BCCI SQUAD ANNOUNCE : श्रीलंका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा, तिलक वर्मा नवीन कर्णधार !

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ हंगामाचा अखेरचा सामना ३१ मे रोजी होणार आहे. याच दरम्यान BCCI ने

CSK IPL 2026 : सीएसकेला मोठा धक्का ! स्टार खेळाडू दुखापतीमुळे हंगामातून बाहेर..

CSK : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती. मात्र संघाने हळूहळू लय

BBL वाद : पगारावरून ऑस्ट्रेलियन खेळाडू नाराज? पॅट कमिन्सने दिले स्पष्टीकरण...

BBL: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बिग बॅश लीगमधून बाहेर पडण्याच्या चर्चांवर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. काही

PBKS vs MI : आज मुंबई-पंजाब आमने सामने; पंजाबसाठी करो या मरो ची लढत, सलग चार पराभवांचा दबाव

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५८ वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात

RCB vs KKR : विराटचा 'विराट' अवतार! कोहलीच्या झंझावाती शतकाने आरसीबीचा केकेआरवर ऐतिहासिक विजय

आयपीएल २०२६ च्या ५७ व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना खऱ्या अर्थाने 'किंग कोहली' नावाचे वादळ पाहायला मिळाले.