Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) ही योजना सध्या सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी (Most Popular and Successful) योजना म्हणून ओळखली जाते. आता याच लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक मोठी आणि दिलासादायक घोषणा (Relief Announcement) केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, ४ नोव्हेंबर (सोमवार) पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २ ते ३ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. यासोबतच, मंत्री तटकरे यांनी योजनेच्या KYC (ई-केवायसी) बद्दलही महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत त्यांनी जारी केली आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. या घोषणेमुळे दिवाळीनंतर लांबणीवर गेलेला हप्ता अखेर खात्यात जमा होणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.



लाडक्या बहिणींसाठी दिवाळीनंतरची मोठी भेट; उद्यापासून सन्मान निधी वितरित


मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!" त्यांनी माहिती दिली की, ऑक्टोबर महिन्याचा 'सन्मान निधी' वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. तटकरे यांनी महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या सुरू असल्याचे नमूद केले. या वाटचालीस खंड पडू नये, यासाठी त्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नम्र विनंती केली आहे की, सर्व लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबरच्या आधी या संकेतस्थळावर E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी (e-KYC) न केल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



अशी करा e-KYC प्रक्रिया ?



  • लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.

  • लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

  • तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा.

  • आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.

  • आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.

  • आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद आल्यावर तो Submit करावा.

  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
    १. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    २. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी