वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळेल श्रीविष्णूचा आशीर्वाद

मुंबई : कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी होणारी वैकुंठ चतुर्दशी यंदा ४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. शिवपुराणानुसार भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना हजार कमळे अर्पण केली होती, त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले. म्हणूनच हा दिवस विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी केलेले काही उपाय जीवनात सुख, शांती आणि प्रगती आणतात असे सांगतात.



सकाळी लवकर स्नान आणि पूजन करा


या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. नंतर गंगाजल मिसळलेल्या पाण्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचा अभिषेक करा आणि विधिवत पूजा करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास विशेष शुभ फळ लाभते.



देवघरात तुपाचा दिवा लावा


वैकुंठ चतुर्दशीला घरातील देवघरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास भगवान विष्णूंना हजार कमळांची फुले अर्पण करा. या दिवशी ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हे मंत्र किमान हजार वेळा जपल्यास दोन्ही देवतांचे कृपाशिर्वाद मिळतात.



बेल आणि तुळशी अर्पण करण्याची परंपरा


या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. त्यामुळे तुम्हीही या दिवशी भगवान विष्णूंना बेलाची आणि भगवान महादेवांना तुळशीची पाने अर्पण करावीत. असे केल्याने प्रगतीचे मार्ग खुलतात असे सांगतात.



उपवास आणि दीपदानाचे महत्व


वैकुंठ चतुर्दशीला उपवास केल्याने पुण्य प्राप्त होते. संध्याकाळी नदीकाठी किंवा तलावाजवळ १४ दिवे लावल्यास भगवान विष्णू आणि महादेव दोघांचेही आशीर्वाद लाभतात. या विशेष दिवशी केलेली ही उपासना जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येते.

Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट