मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन्ही रनवे काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळ प्रशासनाने ही निर्णय देखभाल आणि दुरुस्तीच्या नियोजनाचा भाग म्हणून घेतला आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत रनवे बंद राहतील. पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणेच या वेळी रनवेची तपासणी, पृष्ठभाग दुरुस्ती, प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.


ही बंदी पूर्णतः पूर्वनियोजित असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाईन्सना आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लाइट वेळापत्रकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या देखरेखीमुळे विमानतळाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जागतिक दर्जा अधिक बळकट होईल. ‘सेफ्टी-फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित हा उपक्रम सीएसएमआयएच्या वार्षिक ऑपरेशनल सुसज्जता योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध