पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर ...
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमध्ये मुंबईकरांच्या वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा अपेक्षित मानला जातो. पण शनिवारी सकाळी घेतलेल्या नेांदीनुसार या सर्व धरणांमधील पाणी साठा हा ५०.७७ टक्के अर्थात ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. यापूर्वी ६ जुलै २०२६ रोजी विहार आणि तुळशी तलाव ओसंडून भरु वाहूल लागले होते. त्यामुळे हे दोन्ही तलाव भरले असले तरी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये केवळ ४५ टक्केच पाणी साठा आहे. तर मध्य वैतरणामध्ये ४५ टक्के, तानसा धरणामध्ये ८० टक्के, मोडक सागरमध्ये ७७ टक्के आणि अप्पर वैतरणा धरणात ३० टक्के एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. तानसा धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा जमा झाला असला तरी हे तलाव ओसंडून वाहण्यासाठी दीड मीटरचे अंतर आहे. (BMC News)
अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ...
या सर्व धरणांमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ५०.७७ टक्के एवढा पाणी साठा असला तरी याच तारखेला मागील वर्षी ८१.४७ टक्के एवढा पाणी साठा होता आणि त्या आधीच्या वर्षी म्हणजे सन २०२४मध्ये ३८.४७ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे मागील वर्षी पेक्षा पाणी साठा कमी असला तरी त्या आधीच्या म्हणजे सन १८ जुलै २०२४च्या तुलनेत हा पाणी साठा अधिक आहे.
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेवर जोरदार टीका करत मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने अलीकडेच झालेल्या ...
१८ जुलै ची मागील तीन वर्षांतील स्थिती
सन २०२६ : ० ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर (५०.७७ टक्के)
सन २०२५ : ११ लाख ७९ हजार १४७ दशलक्ष लिटर ( ८१.४७ टक्के)
सन २०२४ : ०५लाख ५६ हजार ७८२ दशलक्ष लिटर (३८.४७ टक्के)