Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, अरबी समुद्रातील वाढलेला वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे. (Maharashtra Weather )



गेल्या वीस दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना पाण्याअभावी फटका बसत होता. काही भागांत दुबार पेरणीची वेळही आली होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. (Rain Update)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Monsson Alert)



सोमवारी मराठवाड्यातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यानंतर २१ जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर २२ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. (Weather News)


दरम्यान, परभणी जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून, पुढील काही दिवसही पावसाची साथ कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच धरणांतील पाणीसाठा वाढण्यासही या पावसाचा मोठा हातभार लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (Monsoon 2026)

Comments
Add Comment

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या

BMC: रुग्णांना केंद्रस्थानी ठेवत सर्व संबंधितांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करा

अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांचे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी):