मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन्ही रनवे काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळ प्रशासनाने ही निर्णय देखभाल आणि दुरुस्तीच्या नियोजनाचा भाग म्हणून घेतला आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत रनवे बंद राहतील. पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणेच या वेळी रनवेची तपासणी, पृष्ठभाग दुरुस्ती, प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.


ही बंदी पूर्णतः पूर्वनियोजित असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाईन्सना आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लाइट वेळापत्रकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या देखरेखीमुळे विमानतळाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जागतिक दर्जा अधिक बळकट होईल. ‘सेफ्टी-फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित हा उपक्रम सीएसएमआयएच्या वार्षिक ऑपरेशनल सुसज्जता योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि