मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन्ही रनवे काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळ प्रशासनाने ही निर्णय देखभाल आणि दुरुस्तीच्या नियोजनाचा भाग म्हणून घेतला आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत रनवे बंद राहतील. पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणेच या वेळी रनवेची तपासणी, पृष्ठभाग दुरुस्ती, प्रकाशयोजना, खुणा आणि ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिक मूल्यांकन अशा कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.


ही बंदी पूर्णतः पूर्वनियोजित असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाईन्सना आगाऊ सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लाइट वेळापत्रकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या देखरेखीमुळे विमानतळाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जागतिक दर्जा अधिक बळकट होईल. ‘सेफ्टी-फर्स्ट’ या तत्त्वावर आधारित हा उपक्रम सीएसएमआयएच्या वार्षिक ऑपरेशनल सुसज्जता योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील