भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत हे जेतेपद पटकावले. या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सत्कार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि संघाचं अभिनंदन करणारा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.


तसेच, संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना राज्य सरकारतर्फे रोख पारितोषिक देण्याचेही ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू आहेत. यात महाराष्ट्रातील सांगलीची कन्या भारताची उपकर्णधार स्मृती मानधना आहे. तिच्याशिवाय भारताच्या सेमीफायनल विजयाची शिल्पकार जेमिमा रॉड्रीग्ज व फिरकीपटू राधा यादव आहेत. या तिन्ही खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. याशिवाय संपूर्ण भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२