महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवस फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस असण्याचे संकेत आहेत. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अंदमान निकोबार येथेही अतिमुसळधार पाऊस होणार आहे.



राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसतोय. आज सकाळीसुद्धा अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याचे दिसले. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले.





दरम्यान, मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोंथा चक्रीवादळ शांत झाले असूनही देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.


महाराष्ट्रात कुठे पडणार मुसळधार पाऊस ?


पुढील २४ तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानंतर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील