स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी कंत्राट संपुष्टात,पण मुदत वाढीला तारीख पे तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची नेमणूक केली असल तरी प्रत्यक्षात याची स्वच्छता राखली जात नाही. उलट यासाठी नेमलेल्या संस्थेलाच आता कंत्राट संपूनही कालावधी वाढवून दिला जात आहे. ३६ महिन्यांकरता नेमलेल्या संस्थेचा ४५ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांचे काम आता तब्बल १८ कोटींवर जावून पोहोचले आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंत्राटदाराची निवड झाल्याने जुन्या संस्थेलाच कालावधी वाढवून दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



मुंबई महापालिकेच्या अखत्यारित एकूण ६८ स्मशानभूमी असून त्यातील ५० स्मशानभूमींची दैनंदिन सफाई राखण्यासाठी ऑगस्ट २०२१मध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांकरता निवड करण्यात आली होती. यासाठी १५.३१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे यासाठी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कालावधी असल्याने यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्याने विद्यमान संस्थेला कालावधी वाढवून दिला जात आहे.यासाठीचा वाढीव कालावधी मार्च २०२५ संपुष्टात आल्यानंतरही पुढील कालावधीसाठीही मुदत वाढवून दिली आहे
Comments
Add Comment

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या