स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी कंत्राट संपुष्टात,पण मुदत वाढीला तारीख पे तारीख

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील स्मशानभूमी आणि दफनभूमींच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांची नेमणूक केली असल तरी प्रत्यक्षात याची स्वच्छता राखली जात नाही. उलट यासाठी नेमलेल्या संस्थेलाच आता कंत्राट संपूनही कालावधी वाढवून दिला जात आहे. ३६ महिन्यांकरता नेमलेल्या संस्थेचा ४५ महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांचे काम आता तब्बल १८ कोटींवर जावून पोहोचले आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने नवीन कंत्राटदाराची निवड झाल्याने जुन्या संस्थेलाच कालावधी वाढवून दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



मुंबई महापालिकेच्या अखत्यारित एकूण ६८ स्मशानभूमी असून त्यातील ५० स्मशानभूमींची दैनंदिन सफाई राखण्यासाठी ऑगस्ट २०२१मध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांकरता निवड करण्यात आली होती. यासाठी १५.३१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे यासाठी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत कालावधी असल्याने यापूर्वी यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्याने विद्यमान संस्थेला कालावधी वाढवून दिला जात आहे.यासाठीचा वाढीव कालावधी मार्च २०२५ संपुष्टात आल्यानंतरही पुढील कालावधीसाठीही मुदत वाढवून दिली आहे
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती