Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे आणि आरोपींनी ही हत्या कोणत्या उद्देशाने केली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



३० सेकंदांत हल्लेखोरांनी गळा चिरला


शहाबाजार परिसरात निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव (Sameer Khan Inayat Khan alias Malegaon) असून त्याचे वय ३० वर्षे होते आणि तो चेलीपुरा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदांत हा प्राणघातक हल्ला केला आणि धारदार शस्त्राने समीर खान यांचा गळा चिरला. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून आणि सूडबुद्धीने झाल्याचा संशय आहे. या संशयाला बळकटी देणारे कारण म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच समीर खान यांच्यावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस आता या हत्येचा आणि मागील गुन्ह्याचा संबंध तपासत आहेत.




'निशान दर्गा' परिसरात दिवसाढवळ्या थरार


शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कबड्डीपटू समीर खान यांची हत्या नेमकी कशी झाली, याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे. समीर खान निशान दर्गा परिसरात उभा असताना, चार आरोपी तेथे आले. यापैकी तिघांनी तोंडाला रुमाल, उपरणे किंवा शाल बांधलेली होती, तर त्यांचा चौथा साथीदार टेहळणी करत होता. तोंड झाकलेल्या या तिघांनी अचानक तलवारीसारख्या धारदार हत्याराने समीरवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीने समीरचा गळा चिरला, तर दुसऱ्याने त्याला चाकूने भोसकले. अवघ्या ३० सेकंदांत हा जीवघेणा हल्ला करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.



मित्राच्या फोननंतर समीर खानची हत्या


समीर खान यांना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मित्र शारेक बाली याचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी समीर खान घरातून आपल्या दुचाकीवरून (MH-20-GD-4058) निघाले होते. घटनेनंतर शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला, सना यांना फोन केला आणि सांगितले की, "भाभी, समीरला तीन-चार जणांनी हत्याराने मारले." माहिती मिळताच समीर यांची पत्नी सना यांनी शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत धाव घेतली, तेव्हा त्यांना त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला सांगितले की, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या चार जणांनी तलवारीने हल्ला केला. या माहितीमुळे पोलिसांनी आरोपींच्या शोधाची आणि पुढील तपासाची दिशा निश्चित केली आहे.



पाचही आरोपी ताब्यात; जुन्या वादातून सूडबुद्धीने हत्या झाल्याचे उघड


समीर खान यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही हत्या सूडबुद्धीने झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे आरोपींची ओळख पटवली. खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास करून सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेतले. समीर खान यांची पत्नी सना खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हत्येमागे जुन्या वादाचे कारण आहे, समीर खान शहागंज मंडी परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान याने समीर खान आणि त्यांचे साथीदार शाहरुख यांच्यावर शस्त्राने हल्ला केला होता, ज्याचा गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी समीर यांनी आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला आणि शोएब काला या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि धमकीची दुसरी तक्रार दिली होती. याच जुन्या तक्रारीचा राग मनात धरून आणि सूडबुद्धीने, आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या पाच जणांनी एकत्र येत पती समीर खान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे सना यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना आज सकाळी (शनिवारी) कोर्टात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 40 अंशाच्या पुढे

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल- छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील

Domstic Violence : 'ओएसडी'कडून पत्नीला बेदम मारहाण; मंत्री अतुल सावे यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : आपल्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे याच्याविरोधात पत्नीने दाखल केलेली तक्रार

Jalgaon Crime : दारुड्या पतीला पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा गळा आवळून हत्या केली

Jalgaon Crime : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीला अखेर पत्नीनं संपवलं आहे. ही घटना जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील केसी

Jalna Crime : अंघोळ करताना व्हिडिओ काढायचा; पीडितेवर सलग १० वर्ष अत्याचार जालनामध्ये भयानक प्रकार उघड...

जालना : पुणे, अकोला आणि आता जालना मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची भयानक मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्र या घटनांनी

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर