Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बरसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'मोंथा' चक्रीवादळ (Montha Cyclon) आता निवळले आहे. परिणामी, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या हवामानातील बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस पाठ सोडणार नाही, मराठवाड्यात गडगडाटी वादळाची शक्यता


यंदाची नवरात्र आणि दिवाळी देखील पावसाने गाजवली. त्यामुळे, आता 'तुळशीचं लग्न' झाल्याशिवाय पाऊस एग्झिट घेणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी आणि संपूर्ण नोव्हेंबर महिन्यासाठीचा अंदाज (Forecast) वर्तवला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या, २ नोव्हेंबरला, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका पावसासह गडगडाटी वादळ (Thunderstorm) होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात देशभरात पाऊस सरासरीपेक्षा जास्त (Above Average) राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही नोव्हेंबर महिन्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.



शनिवार, १ नोव्हेंबरनंतर मुंबईत कोरडे वातावरण अपेक्षित...


गेल्या काही दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पाऊस सुरू होता. या पावसामुळे दिवाळीच्या काळातही वातावरणात गारवा जाणवत होता, तसेच प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली होती. मात्र, आता हवामान विभागाने महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर नंतर मुंबईतील हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढील काही दिवसांत मुंबईकरांना पावसापासून सुटका मिळणार असून, दिवसाच्या तापमानात आणि आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक