भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा करार मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत स्वाक्षरीत झाला. या करारानंतर हेगसेथ म्हणाले की, “हा दहा वर्षांचा अमेरिका-भारत संरक्षण आराखडा आमच्या भागीदारीला अधिक बळ देईल आणि प्रादेशिक स्थैर्य व प्रतिकारशक्तीचा पाया ठरेल. आम्ही समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करत आहोत. आमचे संरक्षणसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत.”


राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले, “क्वालालंपूरमध्ये अमेरिकेचे समकक्ष पीट हेगसेथ यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली. आम्ही 'अमेरिका-भारत प्रमुख संरक्षण भागीदारी आराखडा' या दहा वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार दोन्ही देशांमधील आधीच मजबूत असलेल्या संरक्षण भागीदारीला नवे युग देईल. हा आराखडा भारत-अमेरिका संरक्षणसंबंधांना धोरणात्मक दिशा देईल आणि आमच्या वाढत्या रणनीतिक सहकार्याचे प्रतीक ठरेल.


या नव्या दशकात संरक्षण हे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचे प्रमुख स्तंभ राहील. स्वतंत्र, खुला आणि नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्र निर्माण करण्यासाठी ही भागीदारी निर्णायक ठरेल.” गेल्या काही महिन्यांपासून भारत-अमेरिका संबंधांत काही तणाव दिसून आला होता - टॅरिफ वाद आणि रशियाकडून तेल खरेदी यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद झाले होते. मात्र, या नव्या संरक्षण करारामुळे दोन्ही देश पुन्हा जवळ येत असल्याचे आणि परस्पर विश्वास दृढ होत असल्याचे
स्पष्ट दिसते.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा