आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या (Match Officials) नावांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी हाताळण्याची ऐतिहासिक परंपरा अंतिम सामन्यातही कायम राहणार आहे.

अंतिम सामन्यासाठी निवडलेले अधिकारी:

ऑन-फिल्ड पंच एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
ऑन-फिल्ड पंच जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडीज)
थर्ड अंपायर सू रेडफर्न (इंग्लंड)
फोर्थ अंपायर निमाली परेरा (श्रीलंका)
सामना रेफरी मिशेल परेरा (श्रीलंका)

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विलियम्स यांनी यापूर्वी उपांत्य फेरीत (साउथ आफ्रिका वि. इंग्लंड) पंच म्हणून काम पाहिले होते. जॅकलीन विलियम्स यांनी या स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही पंच म्हणून काम केले होते.

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
Comments
Add Comment

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे