आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या (Match Officials) नावांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी हाताळण्याची ऐतिहासिक परंपरा अंतिम सामन्यातही कायम राहणार आहे.

अंतिम सामन्यासाठी निवडलेले अधिकारी:

ऑन-फिल्ड पंच एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
ऑन-फिल्ड पंच जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडीज)
थर्ड अंपायर सू रेडफर्न (इंग्लंड)
फोर्थ अंपायर निमाली परेरा (श्रीलंका)
सामना रेफरी मिशेल परेरा (श्रीलंका)

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विलियम्स यांनी यापूर्वी उपांत्य फेरीत (साउथ आफ्रिका वि. इंग्लंड) पंच म्हणून काम पाहिले होते. जॅकलीन विलियम्स यांनी या स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही पंच म्हणून काम केले होते.

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच