आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि सामना अधिकाऱ्यांच्या (Match Officials) नावांची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी हाताळण्याची ऐतिहासिक परंपरा अंतिम सामन्यातही कायम राहणार आहे.

अंतिम सामन्यासाठी निवडलेले अधिकारी:

ऑन-फिल्ड पंच एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
ऑन-फिल्ड पंच जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडीज)
थर्ड अंपायर सू रेडफर्न (इंग्लंड)
फोर्थ अंपायर निमाली परेरा (श्रीलंका)
सामना रेफरी मिशेल परेरा (श्रीलंका)

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. एलोइस शेरिडन आणि जॅकलीन विलियम्स यांनी यापूर्वी उपांत्य फेरीत (साउथ आफ्रिका वि. इंग्लंड) पंच म्हणून काम पाहिले होते. जॅकलीन विलियम्स यांनी या स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही पंच म्हणून काम केले होते.

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.
Comments
Add Comment

एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात, मात्र शुभमन आणि श्रेयस संघातून बाहेर! केएल राहुल होणार संघाचा कॅप्टन ?

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र एकदिवसीय

पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७

गुवाहाटी (वृत्तसंस्था): गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ ची तयारी जोरात सुरू असून, अधिकृत गटवाटप २५ नोव्हेंबरला जाहीर होणार असले तरी संभाव्य

Smruti Mandhana : स्मृती मंधानाच्या लग्नसराईला भारतीय महिला संघाची हजेरी! सोशल मीडीयावर मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या विवाहसोहळ्याची धामधूम सध्या जोरात

कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे.

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना