आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला.सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तब्बल ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.



बीसीसीआयकडून १३१ कोटींचे बक्षीस जाहीर


या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी १३१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी ही घोषणा केली. या बक्षिसात संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक मंडळींचा समावेश असणार असून रक्कम सर्वांना समसमान पद्धतीने वाटली जाणार आहे.



प्रत्येक खेळाडूला कोटींचा लाभ


माहितीनुसार, टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला सुमारे ६ ते ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात आनंदाचे वातावरण असून कर्णधार सूर्यासह संजू सॅमसन यालाही समान बक्षीस मिळणार आहे.


बीसीसीआयने आपल्या निवेदनात संघाचे कौतुक करताना म्हटले की, “टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही अशाच यशासाठी शुभेच्छा.”


यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यंदा त्यापेक्षा ६ कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत.


अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. या विजयासह टी-२० विश्वचषक कायम राखणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनण्याचा मान भारताला मिळाला.


इतकेच नव्हे तर भारत आता तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens