Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख आहे. मात्र, आता या परंपरेत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली होती. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही (Chhatrapati Sambhajinagar City Police Force) होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. या निर्णयाकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधले गेले असून, या बदलामागील उद्देशांवर चर्चा सुरू आहे.



जातीयवादाच्या वादातून बीडमध्ये पोलिसांच्या वर्दीवरील आडनाव हटवण्याचा निर्णय


बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलीस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलीस दलात समानता आणि निष्पक्षता वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने घेण्यात आला. राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे केवळ आडनाव हटवल्याने जातीयवाद संपेल का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.



पोलीस दलात 'एकजूट' वाढवण्यासाठी नावपट्टीवर केवळ नावाचा उल्लेख


बीडनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातही पोलीस गणवेशावरील आडनाव हटवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या निर्णयामागे कर्मचाऱ्यांमधून अनेक सकारात्मक मते व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. यामुळे 'आपला -परका' असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही कर्मचाऱ्यांचे मत आहे की, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेतही अशा जातीय ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (Prashant Swami) यांनी या बदलाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल." त्यांनी स्वत: आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले असून, 'आपण आपल्यापुरते पालन करतो आहोत,' असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका

मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या

मराठवाड्यात मविआला मोठा धक्का; परभणी-धाराशिवमध्ये महायुतीचा डंका

धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन

Maharashtra Local Body Elections : "विरोधकांचे 'नरेटिव्ह' भुईसपाट..."; भाजपच्या ऐतिहासिक यशावर मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर सणसणीत टोलेबाजी!

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राचे राजकीय चित्र पुन्हा एकदा