मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत टीम इंडियावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता, पण भारतीय संघ ही संधी साधू शकला नाही. आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.


या आधी टीम इंडियाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर ६ टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही २००८ मध्ये. त्यानंतर १७ वर्षे भारत या मैदानावर विजयी राहिला होता, पण अखेर हा रेकॉर्ड तुटला.


भारताने दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात केली. कर्णधार मिचेल मार्श (४६ धावा, २६ चेंडू) आणि ट्रॅव्हिस हेड (२८ धावा, १५ चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. नंतर इंग्लिस, टिम डेविड, ओव्हन आणि शॉर्ट हे फलंदाज जास्त चमक दाखवू शकले नाहीत, शेवटी मार्कस स्टोइनिसने शांतपणे खेळ करत १३.२ षटकांत संघाला लक्ष्य गाठून दिले. जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन विकेट्स घेत सामन्यात थोडी रंगत आणली,पण ती अपुरी ठरली.


भारताची फलंदाजी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. केवळ अभिषेक शर्मा (६८) आणि हर्षित राणा (३५) यांनीच थोडा लढा दिला. बाकीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. पॉवरप्लेमध्येच भारताने ४ गडी गमावले आणि संपूर्ण संघ १२५ धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अतिशय सोपे लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पार केले.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस