मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत टीम इंडियावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता, पण भारतीय संघ ही संधी साधू शकला नाही. आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.


या आधी टीम इंडियाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर ६ टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही २००८ मध्ये. त्यानंतर १७ वर्षे भारत या मैदानावर विजयी राहिला होता, पण अखेर हा रेकॉर्ड तुटला.


भारताने दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात केली. कर्णधार मिचेल मार्श (४६ धावा, २६ चेंडू) आणि ट्रॅव्हिस हेड (२८ धावा, १५ चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. नंतर इंग्लिस, टिम डेविड, ओव्हन आणि शॉर्ट हे फलंदाज जास्त चमक दाखवू शकले नाहीत, शेवटी मार्कस स्टोइनिसने शांतपणे खेळ करत १३.२ षटकांत संघाला लक्ष्य गाठून दिले. जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन विकेट्स घेत सामन्यात थोडी रंगत आणली,पण ती अपुरी ठरली.


भारताची फलंदाजी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. केवळ अभिषेक शर्मा (६८) आणि हर्षित राणा (३५) यांनीच थोडा लढा दिला. बाकीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. पॉवरप्लेमध्येच भारताने ४ गडी गमावले आणि संपूर्ण संघ १२५ धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अतिशय सोपे लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पार केले.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील