मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत टीम इंडियावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता, पण भारतीय संघ ही संधी साधू शकला नाही. आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.


या आधी टीम इंडियाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर ६ टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही २००८ मध्ये. त्यानंतर १७ वर्षे भारत या मैदानावर विजयी राहिला होता, पण अखेर हा रेकॉर्ड तुटला.


भारताने दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात केली. कर्णधार मिचेल मार्श (४६ धावा, २६ चेंडू) आणि ट्रॅव्हिस हेड (२८ धावा, १५ चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. नंतर इंग्लिस, टिम डेविड, ओव्हन आणि शॉर्ट हे फलंदाज जास्त चमक दाखवू शकले नाहीत, शेवटी मार्कस स्टोइनिसने शांतपणे खेळ करत १३.२ षटकांत संघाला लक्ष्य गाठून दिले. जसप्रीत बुमराहने एका षटकात दोन विकेट्स घेत सामन्यात थोडी रंगत आणली,पण ती अपुरी ठरली.


भारताची फलंदाजी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. केवळ अभिषेक शर्मा (६८) आणि हर्षित राणा (३५) यांनीच थोडा लढा दिला. बाकीचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. पॉवरप्लेमध्येच भारताने ४ गडी गमावले आणि संपूर्ण संघ १२५ धावांवर गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर अतिशय सोपे लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पार केले.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला