महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय महिला संघ विश्वविजेता झाल्यास आपण एक काम करणार असल्याचं वचन दिलं आहे. जर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला तर ते जेमिमा रॉड्रिग्जसोबत ड्युएट सादर करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे.


आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. जर भारत स्पर्धेत विजयी झाला तर आपल्याला जेमिमासोबत गाणं गाण्यास आवडेल असं गावसकरांनी सांगितलं आहे.


“जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर ती आणि मी, जर तिची हरकत नसेल तर आम्ही एकत्र गाणं गाऊ. तिच्याकडे तिचं गिटार असेल आणि मी गाणं गाईन,” असं गावसकरांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हटलं. “काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात आम्ही खरंच असं केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटारवर होती आणि मी गायलो. पण जर भारत जिंकला तर मला ते पुन्हा करायला आवडेल , जर तिची हरकत नसेल. एका वृद्ध व्यक्तीसोबत तिला परफॉर्म करण्यास आवडत असेल तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा