कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार


सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे व अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने विविध नऊ आगारातून १५० जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील.


कार्तिकीच्या एकादशी करिता पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील वारकरी भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी ही उद्या बुधवार 29 आक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. रविवार हा एकादशीचा मुख्य दिवस असणार आहे. तर पौर्णिमा बुधवार रोजी आहे.


राज्यातील सर्वच विभागातून महामंडळाच्या अतिरिक्त वाढीव बसेस धावणार आहेत. कार्तिकीसाठीसुध्दा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाढीव एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मार्गावरून वारकऱ्यांची ने आण केली जाईल. शिवाय, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर जादा बसेसही सोडण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी