कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार


सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे व अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने विविध नऊ आगारातून १५० जादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील.


कार्तिकीच्या एकादशी करिता पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील वारकरी भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी ही उद्या बुधवार 29 आक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. रविवार हा एकादशीचा मुख्य दिवस असणार आहे. तर पौर्णिमा बुधवार रोजी आहे.


राज्यातील सर्वच विभागातून महामंडळाच्या अतिरिक्त वाढीव बसेस धावणार आहेत. कार्तिकीसाठीसुध्दा राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाढीव एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच मार्गावरून वारकऱ्यांची ने आण केली जाईल. शिवाय, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर जादा बसेसही सोडण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार