यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त


ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त आहेत. वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. यावर्षी भागवत एकादशी २ नोव्हेंबरला आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे. यावर्षी तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार, २ नोव्हेंबरपासून, कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, ५ नोव्हेंबरपर्यंत करावयाचा आहे. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभ होईल.


डिसेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी ४, ५ आणि ६ डिसेंबर या तीन शुभ तारखा आहेत. जानेवारी २०२६ या महिन्यात शुक्र ग्रहाच्या दहनामुळे आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे, लग्न करण्यासाठी हा काळ शुभ नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ५, ६, ८, १०, १२, १४, १९, २०, २१, २४, २५ आणि २६ या दिवशी विवाह मुहूर्त आहेत.


मार्च हा एक संक्रमणकालीन महिना म्हणून ओळखला जातो, जो उबदार वसंत ऋतूचे स्वागत करतो आणि हिवाळ्याला निरोप देतो. मार्च २०२६ मध्ये २, ३, ४, ७, ८, ११, १२ रोजी विवाह मुहूर्त आहेत. एप्रिल हा फुलांचा महिना, जेव्हा वसंत ऋतू त्याच्या शिखरावर असतो. या महिन्यात १५, २०, २१, २५, २७, २८ आणि २९ तारखेला विवाह मुहूर्त आहेत.


मे २०२६ मध्ये हिंदू पंचांगामध्ये लग्नासाठी ८ शुभ मुहूर्त आहेत. त्यात १, ३, ५, ६, ७, ८, १३ आणि १४ मे २०२६ या तारखांचा समावेश आहे. जून २०२६ महिन्यात उन्हाळ्याचे लांब दिवस, तेजस्वी सूर्यकिरणांसह आपले आत्मे शुद्ध करतात. या महिन्यात २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २९ जून २०२६ या ८ तारखांना लग्नाचे मुहूर्त असल्याचे हिंदू पंचांगामध्ये नोंद आहे.

Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी