IND vs BAN : क्रूर पाऊस! ICC महिला विश्वचषकात भारताचा विजय हुकला; बांगलादेश पराभवापासून वाचला, बांगलादेश विरुद्धचा सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) हे संघ आमनेसामने होते. दोन्ही संघांसाठी हा स्पर्धेतील सातवा आणि शेवटचा सामना होता. टीम इंडिया या सामन्यात विजयाच्या १०० टक्के जवळ पोहोचली होती. भारताने हा सामना जवळपास जिंकलाच होता. मात्र, पावसाने सातत्याने सामन्यात विघ्न आणले. अखेर, सामना पूर्ण करणे शक्य नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियाचा पाचवा विजय हुकला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला.



डीवाय पाटील स्टेडियमवर पावसामुळे गोंधळ


आयसीसी महिला विश्वचषकातील २८ वा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) आयोजित करण्यात आला होता. मात्र, या संपूर्ण सामन्यात पावसानेच मुख्य भूमिका बजावली. पावसामुळे टॉसला ३५ मिनिटांचा विलंबा झाला. भारताने टॉस जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रथम ४३ ओव्हर्सचा, तर त्यानंतर पुन्हा पावसामुळे तो २७ ओव्हर्सचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश संघाने २७ ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून ११९ धावा केल्या. शर्मीन अक्टर (Sharmin Akhter) हिने सर्वाधिक ३६ धावा केल्या, तर शोभना मोस्त्री (Shobhana Mostary) हिने २६ धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतासाठी राधा यादव (Radha Yadav) हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. श्री चरणी (Shri Charni) हिने २ विकेट्स घेतल्या. रेणुका सिंह ठाकूर (Renuka Singh Thakur), दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि अमनजोत कौर (Amanjot Kaur) या तिघींना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. भारताला विजयासाठी १२० धावांचे आव्हान अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे वेळ वाया गेल्याने डीएलएस नियमानुसार (DLS Method) भारताला विजयासाठी १२६ धावांचे सुधारित आव्हान मिळाले होते.



भारताच्या विजयाचे स्वप्न पावसामुळे भंगले


डीएलएसनुसार मिळालेल्या १२६ धावांच्या सुधारित आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने अत्यंत वादळी सुरुवात केली. सलामीवीर प्रतिका रावल (Pratika Rawal) आणि अमनजोत कौर (Amanjot Kaur) (येथे प्रतिका रावल ऐवजी स्मृती मानधना असा उल्लेख हवा) या जोडीने तडाखेबाज सुरुवात केल्यामुळे, भारत हा सामना १० विकेट्सने जिंकणार असे चित्र निर्माण झाले होते. हा सामना निर्णायक क्षणाकडे झुकत असताना, पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आणि भारताची फलंदाजी रोखली. खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताने ८.४ ओव्हर्समध्ये बिनबाद ५७ धावा केल्या होत्या. यावेळी स्मृती मानधना (Smriti Mandhana) ३४ धावांवर आणि अमनजोत कौर १५ धावांवर नाबाद (Not Out) होत्या. भारताच्या महिला ब्रिगेडने सामना जिंकण्याची पूर्ण तयारी केली असतानाच, पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अखेरीस सामना रद्द करण्याची वेळ आली.



खेळपट्टी कोरडी न झाल्याने भारत-बांगलादेश सामना रद्द


टीम इंडियाने आपल्या तडाखेबाज सुरुवातीमुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचे लक्ष्य सहज गाठण्याची तयारी केली होती. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पंचांकडून बराच वेळ पाऊस थांबण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतीक्षा करण्यात आली. परंतु, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे लक्षात येताच, अखेर सामना रद्द करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे एकीकडे बांगलादेश (Bangladesh) संघ पराभवापासून वाचला, तर दुसरीकडे पावसाने टीम इंडियाचा निश्चित विजय अक्षरशः हिसकावून घेतला. दोन्ही संघांना या रद्द झालेल्या सामन्यातून प्रत्येकी १-१ गुण मिळाला.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात रोमांचक लढत; सामना १-१ च्या बरोबरीत सुटला

फ्लोरिडा : फिफा वर्ल्ड कप 2026 ग्रुप-H मध्ये सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यात महत्त्वाचा सामना झाला. या सामन्यात

FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium : इजिप्तच्या आनंदावर बेल्जियमने फेरलं पाणी; विश्वचषकातील सामना १-१ ने बरोबरीत

फिफा विश्वचषक २०२६ मधील गट ‘जी’च्या सामन्यात बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात १-१ अशी रंगतदार बरोबरी झाली. मात्र या

FIFA World Cup 2026 Spain vs Cape Verde : स्पेनला धक्का! विश्वचषकातील पहिला मोठा उलटफेर; केप व्हर्डेने ऐतिहासिक बरोबरी साधली

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पहिलाच मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पेनला

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या

IND(A) vs SL (A) : मैदानावर ४ धावा, पण स्कोअरबोर्डवर १४; 'पेनल्टी रन'मुळे उडाली खळबळ

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामना: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा रोमांचक घटना पाहायला मिळतात, पण नुकत्याच झालेल्या

FIFA WORLDCUP 2026 : जपानी चाहत्यांकडून स्वच्छतेची परंपरा कायम; नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्टेडियम केले चकाचक

अर्लिंग्टन, टेक्सास: फुटबॉलच्या मैदानात केवळ आपल्या खेळानेच नव्हे, तर आपल्या शिस्तबद्ध वागणुकीने जपानच्या