Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात आता जैन समाजाने एक मोठे पाऊल उचलले आहे. जैन मुनी निलेश चंद्र विजय (Nilesh Chandra Vijay) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जैन समाजाने घेतला आहे. यापूर्वी, मुनी निलेश चंद्र विजय यांनी १ नोव्हेंबर रोजीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे (Denied Permission) त्यांना उपोषणाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. कबुतरखान्यांवरील बंदी हटवल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका जैन समाजाने घेतली आहे.



कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात जैन मुनींनी पुकारलेल्या १ नोव्हेंबरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागे प्रशासनाने दोन प्रमुख कारणे दिली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. १ नोव्हेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांसाठी अधिक आव्हानात्मक ठरू शकते. त्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी (MVA) या दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनीही मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चाची हाक दिली आहे. एकाच दिवशी दोन राजकीय पक्षांचे मोर्चे आणि जैन समाजाचे आंदोलन यामुळे कोणताही अनुचित प्रकार (Untoward Incident) घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जैन मुनींच्या १ नोव्हेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, ज्यामुळे त्यांना उपोषणाची तारीख ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलावी लागली.



जैन समाजाच्या मागण्या कोणत्या?


जैन मुनी निलेश चंद्र विजय यांचे आझाद मैदानावर होणारे आमरण उपोषण केवळ कबुतरखान्यांच्या रक्षणापुरते मर्यादित नाही, तर ते व्यापक मागण्यांसाठी आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वाशी जोडलेली आणि धार्मिक श्रद्धेचा भाग असलेली परंपरा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद झाल्यामुळे अनेक कबुतरे दगावली असल्याचा त्यांचा दावा आहे. यासोबतच त्यांनी मुंबईतील जैन मंदिरांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची मागणी केली आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी गोवंश आणि गोरक्षणाच्या (Cow Protection) मुद्द्यावरही आवाज उठवला आहे. त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जैन प्रार्थनास्थळे, कबुतरखाने आणि गोरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र बोर्ड (Separate Board) स्थापन करावे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार जैन समाजाने केला आहे.



कबुतरखाने बंदीमुळे जैन समाजामध्ये प्रचंड नाराजी


मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे जैन समाजामध्ये (Jain Community) प्रचंड नाराजी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी यापूर्वी "गरज पडल्यास शस्त्रे उचलू" असा इशारा दिला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी शांततामय मार्गाने 'आमरण उपोषणाचे' (Hunger Strike) अस्त्र हाती घेतले आहे. मुंबई पोलिसांनी १ नोव्हेंबरच्या आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतरही, जैन मुनींनी आपला निर्धार कायम ठेवला असून ३ नोव्हेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय (Political) आणि सामाजिक (Social) वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : 'इथेनॉल'च्या ट्रोलिंगबाबत नितीन गडकरींनी दिवाणी खटला दाखल करावा

मुंबई उच्च न्यायालय; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित मुंबई :

Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव https://prahaar.in/2026/07/27/rain-god-blesses-the-kharif-season-what-are-the-dam-water-levels-in-nashik-and-other-divisions/ मुंबई : गुहागर

MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव? https://prahaar.in/2026/07/27/paach-futaacha-bachchan-the-story-of-the-five-foot-bachchan-a-kirtankars-daughter-is-coming-your-way-soon-the-poster-was-released-ashadhi-ekadashi/ मुंबई :

Shocking incident in Mumbai : आधी टीबी, मग दमा; चिमुकलीच्या फुप्फुसात ७ वर्षे अडकले होते पेनचे झाकण!

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान किती महत्त्वाचे असते, याचे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकरण

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या