मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना छठपुजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. सोबतच वंदे मातरम, राष्ट्रगीत हि भाताची जिवंत आणि उत्साही प्रतिमा असल्याचे ही म्हटले, आजच्या 'मन की बात' याचे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी तेलुगूसह भारतातील ११ भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले. आजच्या मन की बात यामध्ये मोदी यांनी सांस्कृतिक आणि आर्थिक उपक्रमांच्या प्रचाराचे कौतुक केले. तसेच आजच्या कार्यक्रमाद्वारे भारत सरकारने 'एआयच्या' मदतीने ११ भाषांमध्ये 'मन की बात' प्रसारित करून आधुनिक भारताची झलक दाखवली. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतास सरकारने एआय सह अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक धावली आहे. भारत हा एआय मध्ये चीन आणि पाश्चिमात्य देशांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. याची एक झलक आज पाहायला मिळाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण किती भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले


'मन की बात' याचा १२७ भाग प्रसारित झाला असून हे भाषण ११ भाषांमध्ये प्रसारित झाले, यात मल्याळम, तेलगू, इंग्रजी, गुजराती, मराठी, आसामी, उडिया, बंगाली, तामिळ, कन्नड या भाषांचा समावेश होता. एआय च्या मदतीमुळेच खेड्यापाड्यातील लाखो लोकांना आपल्या भाषेत आपल्या पंतप्रधानाचे भाषण ऐकता आले. मन की बात यामध्ये मोदी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरमच्या' १५० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त देशवासीयांचे अभिनंदन केले आणि याचे मूल्य पुढील पिढींपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही केले. तसेच आपल्या भाषणात बीएसएफ आणि सीआरपीएफ मधील स्थानिक श्वानांच्या उत्कृष्ट भूमिकेचे आणि शौर्याचे कौतुकही केले.


संस्कृत भाषेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, संस्कृती आणि सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला जीवनाची एक नवीन संधी दिली आहे. सध्या अनेक तरुण रीलद्वारे या भाषेत बोलत आहेत आणि त्याबद्दल जागरूकता पसरवत आहेत. ही या भाषेसाठी महत्त्वाची बाब आहे.

Comments
Add Comment

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर