पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या महासागरात दरवर्षी भाविकांनी भरून जाणाऱ्या पंढरपूर नगरीत यंदाच्या कार्तिकी यात्रेचा लवकरच प्रारंभ होत आहे. यात्रेच्या काळात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून विशेष धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे. विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे, आणि आता भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


श्री विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी "लोड" तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी "तक्क्या" ठेवण्यात आले आहे. या पारंपरिक विधीनंतर आता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन अखंड सुरू राहणार आहे. यावेळी काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती या राजोपचारांना तात्पुरता विराम देण्यात आला असून, नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. भाविकांना हे अखंड दर्शन ९ नोव्हेंबर म्हणजेच प्रक्षाळपूजेपर्यंत पर्यंत मिळणार आहे.


गर्दी नियंत्रणासाठी आणि दर्शनरांगा जलदगतीने पुढे सरकाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत. परंपरेनुसार पलंग काढल्यानंतर श्रींचे २४ तास मुखदर्शन व २२.१५ तास चरणदर्शन उपलब्ध असते. तसेच मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून आणि विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी पडद्यांद्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.


यात्रेच्या काळात सर्व व्हीआयपी दर्शन आणि खास पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत. श्रींच्या परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी काटेकोरपणे पार पाडले जात असून, पलंग काढणे, एकादशी पूजन, महानैवेद्य, पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला व प्रक्षाळपूजा या विधींचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे.


मागील आषाढी यात्रेतील अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या कार्तिकी यात्रेचे नियोजन अधिक सुयोग्यपणे करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा