पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या महासागरात दरवर्षी भाविकांनी भरून जाणाऱ्या पंढरपूर नगरीत यंदाच्या कार्तिकी यात्रेचा लवकरच प्रारंभ होत आहे. यात्रेच्या काळात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून विशेष धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे. विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे, आणि आता भाविकांना २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


श्री विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी "लोड" तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी "तक्क्या" ठेवण्यात आले आहे. या पारंपरिक विधीनंतर आता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन अखंड सुरू राहणार आहे. यावेळी काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती या राजोपचारांना तात्पुरता विराम देण्यात आला असून, नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. भाविकांना हे अखंड दर्शन ९ नोव्हेंबर म्हणजेच प्रक्षाळपूजेपर्यंत पर्यंत मिळणार आहे.


गर्दी नियंत्रणासाठी आणि दर्शनरांगा जलदगतीने पुढे सरकाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्या आहेत. परंपरेनुसार पलंग काढल्यानंतर श्रींचे २४ तास मुखदर्शन व २२.१५ तास चरणदर्शन उपलब्ध असते. तसेच मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून आणि विविध ठिकाणी लावलेल्या एलईडी पडद्यांद्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.


यात्रेच्या काळात सर्व व्हीआयपी दर्शन आणि खास पूजा बंद ठेवण्यात आल्या आहेत. श्रींच्या परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी काटेकोरपणे पार पाडले जात असून, पलंग काढणे, एकादशी पूजन, महानैवेद्य, पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला व प्रक्षाळपूजा या विधींचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे.


मागील आषाढी यात्रेतील अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या कार्तिकी यात्रेचे नियोजन अधिक सुयोग्यपणे करण्यात आले आहे. भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह