उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील कुख्यात गुंड करण आणि अर्जुन यांच्या विरोधात संबंधित पत्रकाराने बातमी प्रसारित केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.



उल्हासनगरच्या शिव कॉलनीमध्ये राहणारे गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांची परिसरात फार दहशत आहे. आपल्या विरोधात पत्रकाराने दिलेली बातमी त्यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवार, २४ ऑक्टोबरच्या रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संदीपच्या भावाच्या हातावर तलवारीने वार करण्यात आला. तर संदीप सिंह याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी आहेत.



या घटनेसंदर्भात हिललाईन पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ला करताना मुख्य आरोपी करण आणि अर्जुनसोबत त्यांचे इतर दोन साथी होते. त्यापैकी दोघांना पकडण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी अजून फरार आहेत. या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट