उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरात ही घटना घडली आहे. परिसरातील कुख्यात गुंड करण आणि अर्जुन यांच्या विरोधात संबंधित पत्रकाराने बातमी प्रसारित केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.



उल्हासनगरच्या शिव कॉलनीमध्ये राहणारे गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांची परिसरात फार दहशत आहे. आपल्या विरोधात पत्रकाराने दिलेली बातमी त्यांना पटली नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवार, २४ ऑक्टोबरच्या रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संदीपच्या भावाच्या हातावर तलवारीने वार करण्यात आला. तर संदीप सिंह याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी आहेत.



या घटनेसंदर्भात हिललाईन पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. हल्ला करताना मुख्य आरोपी करण आणि अर्जुनसोबत त्यांचे इतर दोन साथी होते. त्यापैकी दोघांना पकडण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी अजून फरार आहेत. या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.