चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पश्चिम बंगाललाही या वादळाचा धोका आहे. याशिवाय चक्रीवादळ मोंथा पुढे सरकण्याचा शक्यतेमुळे आंध्र प्रदेश सरकारने मदत आणि आवश्यक पुरवठ्यासाठी योजना तयार केल्या आहेत . लष्कराच्या तुकड्या देखील सतर्क करण्यात आल्या आहेत.


भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की " चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळच्या ११० किलोमीटरपर्यंत प्रचंड हवेची गती असणाऱ्या चक्रीवादळाच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये अती मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.


अलर्ट


हवामान विभागाने दक्षिण ओडिशाला पावसाचा इशारा दिला आहे. ओडिशात काही ठिकाणी २० मिलीमीटर पेक्षाही अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द प्रचंड वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक जिल्हे प्रभावित होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य भागांमधून नागरिकांचे सुरक्षित ठिकणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,