चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू पूर्व किनाऱ्याकडे सरकत आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने ३० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पश्चिम बंगाललाही या वादळाचा धोका आहे. याशिवाय चक्रीवादळ मोंथा पुढे सरकण्याचा शक्यतेमुळे आंध्र प्रदेश सरकारने मदत आणि आवश्यक पुरवठ्यासाठी योजना तयार केल्या आहेत . लष्कराच्या तुकड्या देखील सतर्क करण्यात आल्या आहेत.


भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे की " चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान काकीनाडाजवळच्या ११० किलोमीटरपर्यंत प्रचंड हवेची गती असणाऱ्या चक्रीवादळाच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये अती मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.


अलर्ट


हवामान विभागाने दक्षिण ओडिशाला पावसाचा इशारा दिला आहे. ओडिशात काही ठिकाणी २० मिलीमीटर पेक्षाही अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द प्रचंड वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक जिल्हे प्रभावित होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य भागांमधून नागरिकांचे सुरक्षित ठिकणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८

गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री प्रमोद सांवतांनी दिले चौकशीचे आदेश

अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास