Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी?


मुंबई : राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिरसाट यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



शिरसाट काय म्हणाले?


एका जाहीर कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "राजकारण दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं, आता थांबावं असं वाटतंय. राजकारणात आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर ते अधिक बरं असतं."



निवृत्ती की राजकीय खेळी?


संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सिडको भूखंड प्रकरण (५ हजार कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा रोहित पवारांचा आरोप), बेडरूममधील पैशांची बॅग आणि सामाजिक न्याय विभागातील टेंडर घोटाळा अशा अनेक वादांमुळे शिरसाट चर्चेत आहेत.


विरोधकांनी वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे ते मंत्रिमंडळात कायम आहेत.


अशा परिस्थितीत, संजय शिरसाट यांचा हा निवृत्तीचा निर्णय खरंच मनापासून आहे, की कुटुंबातील नव्या पिढीला (घराणेशाहीतून) राजकारणात सक्रिय करण्यासाठी ही त्यांची रणनीतिक खेळी आहे? याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात