Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी?


मुंबई : राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिरसाट यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



शिरसाट काय म्हणाले?


एका जाहीर कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "राजकारण दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं, आता थांबावं असं वाटतंय. राजकारणात आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर ते अधिक बरं असतं."



निवृत्ती की राजकीय खेळी?


संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सिडको भूखंड प्रकरण (५ हजार कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा रोहित पवारांचा आरोप), बेडरूममधील पैशांची बॅग आणि सामाजिक न्याय विभागातील टेंडर घोटाळा अशा अनेक वादांमुळे शिरसाट चर्चेत आहेत.


विरोधकांनी वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे ते मंत्रिमंडळात कायम आहेत.


अशा परिस्थितीत, संजय शिरसाट यांचा हा निवृत्तीचा निर्णय खरंच मनापासून आहे, की कुटुंबातील नव्या पिढीला (घराणेशाहीतून) राजकारणात सक्रिय करण्यासाठी ही त्यांची रणनीतिक खेळी आहे? याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी