Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी?


मुंबई : राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिरसाट यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.



शिरसाट काय म्हणाले?


एका जाहीर कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "राजकारण दिवसेंदिवस वाईट होत चालले आहे. त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं, आता थांबावं असं वाटतंय. राजकारणात आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर ते अधिक बरं असतं."



निवृत्ती की राजकीय खेळी?


संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गैरव्यवहार, भ्रष्टाचार, सिडको भूखंड प्रकरण (५ हजार कोटी रुपयांची जमीन बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचा रोहित पवारांचा आरोप), बेडरूममधील पैशांची बॅग आणि सामाजिक न्याय विभागातील टेंडर घोटाळा अशा अनेक वादांमुळे शिरसाट चर्चेत आहेत.


विरोधकांनी वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे ते मंत्रिमंडळात कायम आहेत.


अशा परिस्थितीत, संजय शिरसाट यांचा हा निवृत्तीचा निर्णय खरंच मनापासून आहे, की कुटुंबातील नव्या पिढीला (घराणेशाहीतून) राजकारणात सक्रिय करण्यासाठी ही त्यांची रणनीतिक खेळी आहे? याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील