Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! एक्स्प्रेस वे आता 'दहा पदरी' करण्याचा MSRDCचा मोठा निर्णय, असा असणार 'मास्टर प्लॅन'

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीने आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दहा पदरी (Ten-Lane) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार आहे. हा दहा पदरी एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासातील वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



'१० दिवसांत' सरकारकडे प्रस्ताव


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) वेगाने काम करत आहे. एक्स्प्रेस वे दहा पदरी (Ten-Lane) करण्याचा प्रस्ताव येत्या १० दिवसांमध्ये राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सध्या या महामार्गावरून दररोज ६५ हजारांपेक्षा जास्त वाहने धावतात. हा महामार्ग या वाहनांच्या संख्येसाठी अपूरा पडू लागल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्व समस्या विचारात घेऊन एमएसआरडीसीने हा महामार्ग १० पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर होताच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुसाट आणि जलद प्रवासासाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे दहा पदरीकरण; १५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित


सध्या सहा पदरी असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आता दहा पदरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) यासाठी हालचालींना वेग आला असून, तयारी सुरू करण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेच्या या मोठ्या विस्तारीकरणासाठी सुमारे ₹१५,००० कोटींचा (पंधरा हजार कोटी) प्रचंड खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग २०३० पर्यंत दहा पदरी केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा महामार्ग ९४.६ किलोमीटर लांबीचा असून, यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे, सततची वाहतूक कोंडी, अपघात, वाहनचालकांच्या समस्या, या सर्व बाबी लक्षात घेऊन भविष्यातील गरजांचा विचार करून एक्स्प्रेस वेचा विस्तार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पूर्वी सहा पदरीवरून आठ पदरी करण्याची योजना होती, पण आता थेट दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी आणखी कमी करण्यासाठी १३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे (Missing Link Project) कामही वेगाने सुरू आहे. हे काम काही दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात