Ishwarpur Name : मोठी बातमी, 'इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर! अखेर केंद्र सरकारचा नामकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब, पत्र जारी

सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli District) इस्लामपूर (Islampur) शहराच्या नामकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारची (Central Government) मान्यता मिळाली आहे. यामुळे आता इस्लामपूर शहराच्या नावात कायदेशीररित्या 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असा बदल होणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी शेवटच्या दिवशी राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर (Ishwarpur) असे करणार असल्याचे सांगितले होते. या नामकरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून (Survey of India) या नामकरणाला मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. या मान्यतेनंतर इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे 'ईश्वरपूर' (Ishwarpur) असे बदलण्यात येणार आहे.



४०-५० वर्षांची मागणी पूर्ण


या नामकरणाची मागणी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून सातत्याने चर्चेत होती. पंत सबनीस (Pant Sabnis): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी चार-पाच दशकांपूर्वी शहराचे नामकरण 'ईश्वरपूर' करावे, अशी मागणी सर्वप्रथम केली होती. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपूर येथील यल्लमा चौकात झालेल्या जाहीर सभेत प्रथमच व्यासपीठावरून 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' असा उल्लेख केला होता. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सभागृहात 'इस्लामपूर नव्हे, तर हे ईश्वरपूर' अशी घोषणा केली. मंत्रिमंडळाने या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता, ज्याला आता केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. शहराचे नामांतरण 'ईश्वरपूर' झाल्यानंतर यापुढे ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ यासह तालुका, जिल्हा आणि सर्वच शासकीय, निमशासकीय संस्था, व्यवसाय, उद्योग आणि इतर सर्व स्तरावर 'ईश्वरपूर' हेच नाव वापरले जाईल.

Comments
Add Comment

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत