दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी दुर्घटना घडली. 'कावेरी ट्रॅव्हल्स'च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात स्लीपर कोच बस असल्यामुळे बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. यावेळी दुचाकीची धडक बसच्या इंधन टाकीला लागली. त्यामुळे बसच्या इंधन टाकीपासून आग लागण्यास सुरुवात झाली. ही आग एवढी वेगात पसरली की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही. त्यात ज्या प्रवाशांना आगीचा अंदाज आला त्यांनी आपत्कालीन दरवाजा उघडून बसबाहेर उड्या मारल्या आणि आपला जीव वाचवला. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांवर कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





या दुर्घटनेबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या अधिकृत खात्यावर पोस्ट करत सांगितले की, "चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत."

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत २० जणांनी जीव गमावला होता. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Comments
Add Comment

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या