एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा २२वा सामना दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पार पडल्यानंतर गुणतालिकेतील चित्र बदलले असून स्पर्धेतून पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन संघ बाद झाले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी आता तीन संघात चुरस रंगणार आहे. ज्यात भारतीय महिलांचा संघदेखील सहभागी आहे.


उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडने आपली जागा पक्की केली आहे. आता उपांत्य फेरीसाठी केवळ एक जागा शिल्लक असून त्यावर भारत, न्युझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एका जागेसाठी जोरदार लढत होणार आहे. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहे. जर भारताने दोनही सामने जिंकले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत जागा निर्माण करू शकतो.


उपांत्य फेरीसाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर उपांत्य फेरीत भारताचे स्थान निश्चित होईल. अन्यथा बांग्लादेशसोबतच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे अनिवार्य असेल. भारताने जर बांग्लादेशसोबत विजय मिळवला तर न्यूझीलंडसमोर इंग्लंडचे आव्हान उभे राहणार आहे. ज्यात न्यूझीलंडची हार झाली तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील