हिट अँड रन, भरधाव बोलेरोने दोन तरुणींना उडवले

अमरावती : महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'हिट अँड रन'ची घटना घडली. भरधाव बोलेरो कारने दोन तरुणींना उडवले. या घटनेनंतर चालक कारसह घटनास्थळावरुन फरार झाला. राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार, २२ वर्षांची पायल राजेंद्र बुंदेले आणि तिची २१ वर्षांची मैत्रीण वैष्णवी विष्णू थोरात या दोघी रस्त्यावरुन जात होत्या. त्याचवेळी कंवरनगर भागात मागून येणाऱ्या भरधाव पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी अपघात स्थळावरुन पायल आणि वैष्णवीला रुग्णालयात दाखल केले. पायलच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिला असलेला धोका टळला आहे. पण वैष्णवीची प्रकृती अद्याप गंभीर आहे.


चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. पोलीस बोलेरो चालकाचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून

निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला, MPSC परीक्षेवर होणार परिणाम?

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीचा म्हणजे नगरपालिका आणि

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक