एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा पडतोय तर कुठे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतो आहे. गॅस सिलिंडरसाठी अक्षरश: भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोक तासंतास उभं राहून गॅस सिलिंडर घेत आहेत. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


नव्या नियमांनुसार, ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.



उज्ज्वला लाभार्थी आणि ग्रामीण भागासाठी वेगळे नियम


गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सिंगल सिलिंडर कनेक्शन म्हणजे ज्याच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा नियम अधिक कडक केले आहेत.


त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. OTP आणि e-KYC हे महत्त्वाचं असेल. डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगणं आता बंधनकारक आहे. तसेच, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.



१२ सिलिंडरचा कोटा संपला तर काय होणार?


सरकार एका वर्षात १२ सिलिंडरवर सबसिडी देते. जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल, तर १३ व्या सिलिंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, घरी पाहुणे आले आहेत का किंवा घरात काही कार्य आहे का, अशी माहिती द्यावी लागेल. या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त सिलिंडर देण्याचा निर्णय घेईल.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर