एलपीजी सिलिंडर आता २५ दिवसांनी नाही तर एवढ्या दिवसांनी बुक करता येणार

मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या झळा आता भारताला तीव्र बसायला लागल्या आहेत. कुठे इंधनाचा पुरवठा अपुरा पडतोय तर कुठे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवतो आहे. गॅस सिलिंडरसाठी अक्षरश: भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोक तासंतास उभं राहून गॅस सिलिंडर घेत आहेत. तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कंपन्यांनी आता सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


नव्या नियमांनुसार, ग्राहकांना ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी आता बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. ज्या ग्राहकांकडे डबल सिलिंडर कनेक्शन आहे, त्यांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान ३५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी ही मर्यादा २५ दिवसांची होती. गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्वांना वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.



उज्ज्वला लाभार्थी आणि ग्रामीण भागासाठी वेगळे नियम


गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे नियम लावले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढच्या बुकिंगसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. सिंगल सिलिंडर कनेक्शन म्हणजे ज्याच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, ते डिलिव्हरीनंतर २५ दिवसांनी नवीन बुकिंग करू शकतील. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा नियम अधिक कडक केले आहेत.


त्यांना पुढील बुकिंगसाठी ४५ दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य आहे. OTP आणि e-KYC हे महत्त्वाचं असेल. डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगणं आता बंधनकारक आहे. तसेच, ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे बुकिंग रद्द केले जाऊ शकते.



१२ सिलिंडरचा कोटा संपला तर काय होणार?


सरकार एका वर्षात १२ सिलिंडरवर सबसिडी देते. जर एखाद्या ग्राहकाने आपला हा कोटा पूर्ण केला असेल, तर १३ व्या सिलिंडरसाठी त्यांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, घरी पाहुणे आले आहेत का किंवा घरात काही कार्य आहे का, अशी माहिती द्यावी लागेल. या माहितीची पडताळणी केल्यानंतरच कंपनी अतिरिक्त सिलिंडर देण्याचा निर्णय घेईल.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध