आशिया कप ट्रॉफीवरून रणसंग्राम: BCCI vs नक्वी, ट्रॉफीचा तिढा सुटत नाही!

नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांच्यात या ट्रॉफीच्या हस्तांतरावरून तणाव निर्माण झाला आहे. ट्रॉफी भारताला देण्यास ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांनी नकार दिला असून, त्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये मतभेद वाढले आहेत.


BCCIने नुकताच ACCला एक अधिकृत मेल करून, आशिया कपची विजेतेपद ट्रॉफी भारताला पाठवण्याची विनंती केली होती. मात्र ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांनी त्याला प्रत्युत्तर देताना, "कोणताही भारतीय प्रतिनिधी दुबईतील ACC मुख्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जावा," अशी अट घातली. ही अट BCCIने फेटाळली असून त्यांनी ट्रॉफी भारतातच पाठवण्याची ठाम भूमिका घेतली आहे.


बीसीसीआयचा आक्रमक पवित्रा


BCCIने नक्वींकडून थेट ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बोर्डाचे पदाधिकारी या मुद्यावर ICCच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा करणार आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, विजेता संघ असूनही ट्रॉफी न मिळणे हे अपमानास्पद आहे आणि ACCचे वर्तन अनावश्यक राजकीय हस्तक्षेपासारखे वाटत आहे.


२८ सप्टेंबर रोजी भारताने आशिया कप फायनल जिंकला होता. मात्र मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन परत गेले आणि ती अजूनही ACCच्या मुख्यालयात आहे. या घटनेनंतर वाद अधिकच चिघळला.


मोहसिन नक्वी यांनी आशिया कप दरम्यान आपल्या सोशल मीडिया हँडलवर भारताच्या सैन्य कारवाईविरोधात टीका करणारे व्हिडिओ आणि मीम्स पोस्ट केले होते. यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. ACCच्या नंतरच्या बैठकीतही दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. ACCच्या कर्मचाऱ्यांना नक्वी यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही ट्रॉफी भारताला देऊ नये.


सध्या ICCचे अध्यक्ष जय शाह हे बीसीसीआयचे माजी सचिव आहेत. त्यामुळे ICCच्या पुढील बैठकीत या प्रकरणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. BCCI आणि ACCमधील हा वाद केवळ क्रीडा क्षेत्रापुरता न राहता राजकीय रंग घेऊ लागला आहे.


आशिया कप 2025 ची ट्रॉफी विजेता भारताच्या घरी जाण्याऐवजी अजूनही ACC मुख्यालयात अडकून पडली आहे. ACC प्रमुख मोहसिन नक्वी यांची अट आणि बीसीसीआयचा नकार यामुळे वाद वाढत चालला आहे. ICC या प्रकरणात काय भूमिका घेते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील