स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना 'दिवाळी' भेट, मिळाला एवढा मोठा निधी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे. आमदारांकडून दलित वस्त्यांमध्ये रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, सामुदायिक सभागृह आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले. मंजूर झालेल्या निधीमुळे समाजातील मागास भागांमध्ये विकासकामांना गती मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी निधी वितरित झाल्यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर विरोधकांपैकी एकाही आमदाराला सामाजिक विकास योजनेचा निधी मिळालेला नाही. यामुळे विरोधकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा (पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये वगैरे) देण्यावर प्राधान्य देण्यात येते. या योजनेत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष काम करण्यासाठी निधी दिला जातो.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीआधी निधी मिळाल्यामुळे आमदारांना स्थानिक भागात विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत