स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना 'दिवाळी' भेट, मिळाला एवढा मोठा निधी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे. आमदारांकडून दलित वस्त्यांमध्ये रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, सामुदायिक सभागृह आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले. मंजूर झालेल्या निधीमुळे समाजातील मागास भागांमध्ये विकासकामांना गती मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी निधी वितरित झाल्यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर विरोधकांपैकी एकाही आमदाराला सामाजिक विकास योजनेचा निधी मिळालेला नाही. यामुळे विरोधकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा (पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये वगैरे) देण्यावर प्राधान्य देण्यात येते. या योजनेत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष काम करण्यासाठी निधी दिला जातो.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीआधी निधी मिळाल्यामुळे आमदारांना स्थानिक भागात विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

विम्बल्डन: सेरेना विल्यम्सचे पुनरागमन; पहिल्या फेरीत २० वर्षीय माया जॉइंटशी होणार मुकाबला

  लंडन : टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्स विम्बल्डन २०२६ मध्ये पुन्हा एकदा कोर्टवर उतरण्यासाठी

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Secretary Kiran Pawaskar : उद्धव ठाकरेंनी “माफी दौरा” काढावा”

मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका मुंबई  :

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी