राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट मिळाली आहे. अतिदुर्गम भागातील बार्शीमाळ गावामधील उमरटकर वस्ती व बालवड गावातील मोरे वस्तीत वीज जोडणी नव्हती. त्यामुळे ऐन दिवाळी अंधारात साजरी करणाऱ्या उमराटकर-मोरे वस्तीतील स्थानिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.


महावितरणाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचा वीज जोडणीचा प्रश्न कित्येक वर्षांनी सुटला आहे. वस्तीतील नागरिकांनी घरात वीज मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. मंजुरीकरिता अंदाजपत्रक मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता बैकर यांच्याकडे वेल्हा शाखा कार्यालयामधून शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी पाठविले. त्यावर कार्यकारी अभियंता बैकर यांनी वास्तव्य जाणून घेत अंदाजपत्रक तात्काळ मंजूर करून कामास सुरूवात केली.


महावितरणने अवघ्या ४८ तासांत काम पूर्ण करून सर्व घरांना वीज मीटर बसवले. त्यामुळे या भागातील सर्व घरे प्रकाशमय झाली आहेत. त्यामुळे यावर्षीची नागरिकांची दिवाळी प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कुलकर्णी, थोरवे मॅडम, सोनसळे, आग्रवाल ठेकेदार व मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैक यांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन