राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट मिळाली आहे. अतिदुर्गम भागातील बार्शीमाळ गावामधील उमरटकर वस्ती व बालवड गावातील मोरे वस्तीत वीज जोडणी नव्हती. त्यामुळे ऐन दिवाळी अंधारात साजरी करणाऱ्या उमराटकर-मोरे वस्तीतील स्थानिकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले.


महावितरणाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांचा वीज जोडणीचा प्रश्न कित्येक वर्षांनी सुटला आहे. वस्तीतील नागरिकांनी घरात वीज मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. मंजुरीकरिता अंदाजपत्रक मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता बैकर यांच्याकडे वेल्हा शाखा कार्यालयामधून शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी पाठविले. त्यावर कार्यकारी अभियंता बैकर यांनी वास्तव्य जाणून घेत अंदाजपत्रक तात्काळ मंजूर करून कामास सुरूवात केली.


महावितरणने अवघ्या ४८ तासांत काम पूर्ण करून सर्व घरांना वीज मीटर बसवले. त्यामुळे या भागातील सर्व घरे प्रकाशमय झाली आहेत. त्यामुळे यावर्षीची नागरिकांची दिवाळी प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्याबद्दल नागरिकांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कुलकर्णी, थोरवे मॅडम, सोनसळे, आग्रवाल ठेकेदार व मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैक यांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले