दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी अयोध्येतील राम मंदिर, 'ऑपरेशन सिंदूर', नक्षलप्रभावित भागातील बदल, आर्थिक सुधारणा आणि देशाच्या भविष्यातील दिशेबाबत आपली भूमिका मांडली आहे.


मोदींनी नमूद केलं की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरची ही दुसरी दिवाळी असून, प्रभू श्रीरामाच्या आदर्शांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अन्यायाचा बदला घेतला. त्यांनी म्हटलं, “राम आपल्याला सन्मान टिकवण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण देतात. भारतानेही हेच केलं.”



नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासाचे प्रकाशदिवे


पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रात देशातील नक्षलग्रस्त भागातील बदलांवर भर दिला. अनेक जिल्ह्यांत, जे आधी हिंसाचारामुळे अंधारात होते, आता प्रथमच दिवाळीच्या दिव्यांनी उजळले आहेत. विकासाच्या प्रवाहात या भागांचा समावेश होणं ही भारतासाठी मोठी कामगिरी असल्याचं मोदींनी सांगितलं.



आर्थिक स्थैर्य आणि सुधारणा


नुकत्याच झालेल्या जीएसटी दरातील कपातीमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार नागरिकांची हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था स्थिरतेचं आणि लवचिकतेचं प्रतीक ठरत असून, देश लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



स्वदेशी आणि आरोग्याच्या दिशेने पाऊल


पंतप्रधानांनी जनतेला स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करावा, आपल्या जीवनशैलीत स्वच्छता, योग आणि आरोग्यविषयक सवयी जोपासाव्यात, असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी तेलाचे प्रमाण १०% नी कमी करण्याची आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली.



सकारात्मकतेचा दीप उजळवण्याचं आवाहन


मोदींनी पत्राचा शेवट करताना एक महत्त्वाचा संदेश दिला, “जसं एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो आणि प्रकाश वाढतो, तसंच आपणही समाजात एकमेकांमध्ये सहकार्य, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवावा.”


पंतप्रधान मोदींचं हे पत्र म्हणजे देशवासियांना प्रेरणा देणारा आणि एक सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण भारत उभारण्याच्या दिशेने मार्गदर्शन करणारा संदेश आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या