दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात त्यांनी अयोध्येतील राम मंदिर, 'ऑपरेशन सिंदूर', नक्षलप्रभावित भागातील बदल, आर्थिक सुधारणा आणि देशाच्या भविष्यातील दिशेबाबत आपली भूमिका मांडली आहे.


मोदींनी नमूद केलं की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरची ही दुसरी दिवाळी असून, प्रभू श्रीरामाच्या आदर्शांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अन्यायाचा बदला घेतला. त्यांनी म्हटलं, “राम आपल्याला सन्मान टिकवण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण देतात. भारतानेही हेच केलं.”



नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासाचे प्रकाशदिवे


पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रात देशातील नक्षलग्रस्त भागातील बदलांवर भर दिला. अनेक जिल्ह्यांत, जे आधी हिंसाचारामुळे अंधारात होते, आता प्रथमच दिवाळीच्या दिव्यांनी उजळले आहेत. विकासाच्या प्रवाहात या भागांचा समावेश होणं ही भारतासाठी मोठी कामगिरी असल्याचं मोदींनी सांगितलं.



आर्थिक स्थैर्य आणि सुधारणा


नुकत्याच झालेल्या जीएसटी दरातील कपातीमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार नागरिकांची हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था स्थिरतेचं आणि लवचिकतेचं प्रतीक ठरत असून, देश लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



स्वदेशी आणि आरोग्याच्या दिशेने पाऊल


पंतप्रधानांनी जनतेला स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करावा, आपल्या जीवनशैलीत स्वच्छता, योग आणि आरोग्यविषयक सवयी जोपासाव्यात, असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी तेलाचे प्रमाण १०% नी कमी करण्याची आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली.



सकारात्मकतेचा दीप उजळवण्याचं आवाहन


मोदींनी पत्राचा शेवट करताना एक महत्त्वाचा संदेश दिला, “जसं एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो आणि प्रकाश वाढतो, तसंच आपणही समाजात एकमेकांमध्ये सहकार्य, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवावा.”


पंतप्रधान मोदींचं हे पत्र म्हणजे देशवासियांना प्रेरणा देणारा आणि एक सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण भारत उभारण्याच्या दिशेने मार्गदर्शन करणारा संदेश आहे.

Comments
Add Comment

दिल्ली स्फोटाचे यूपी कनेक्शन; एटीएसची लखनऊमध्ये महिला डॉक्टरच्या घरी छापेमारी

लखनऊ : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलीस आणि उत्तर

दिल्ली स्फोटाचे UP कनेक्शन, योगी सरकार अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातो आहे, तसतसे नवे धागेदोरे समोर येत आहेत. आता या

Delhi Blast : स्फोटाचा तपास आता 'ऑनलाईन'! दहशतवाद्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स रडारवर; दहशतवाद्यांना फुटणार घाम?

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी स्फोटाने हादरल्यानंतर आता या भीषण घटनेमागील

Red Fort Blast : षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही!' दिल्ली स्फोटावर पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा; दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort Blast) झालेल्या कार स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत

लाल किल्ला मेट्रोजवळ भीषण स्फोट; फरिदाबाद मॉड्युलचा उमर मोहम्मद प्रमुख सूत्रधार ?

नवी दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोमवारी झालेला स्फोट हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे तपास

Delhi Blast : लाल किल्ला स्फोट : ४ डॉक्टरांचे दहशतवादी कनेक्शन उघड; शिक्षण क्षेत्राचा वापर 'काळ्या कारनाम्यांसाठी'

फरीदाबाद : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी झालेल्या भीषण कार