सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील जनरेटरला लागलेली आग ताजी असतानाच, रविवारी पहाटे कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा वसाहतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागून शिरोडिया कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

या आगीत रेखा शिसोडिया (आई) आणि पायल शिसोडिया (मुलगी) हे दोघे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात तीन गॅस सिलिंडर असल्याने आगीचा भडका उडाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसरी घटना वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये घडली. रात्री दीडच्या सुमारास १९व्या मजल्यावर आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सलग लागलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषत: उंच इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टीम कार्यरत आहे का, गृहसंस्थांनी सेफ्टी ऑडिट केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता महापालिका प्रशासन यावर कारवाई करते की बघ्याची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी