बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर आयसीसीच्या बैठकीत हा विषय मांडला जाईल, असा इशारा बीसीसीआयने एसीसी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. बीसीसीआयने एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे इशारा दिला आहे की, जर भारताला विजेतेपदाची ट्रॉफी दिली गेली नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.


बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माध्यमांना सांगितले की, जर नक्वी यांनी या प्रकरणावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर बीसीसीआय टप्प्याटप्प्याने कारवाईची तीव्रता वाढवेल.


आशिया चषक २०२५ मध्ये २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून स्पर्धा जिंकली. मात्र, विजयानंतर ट्रॉफी सादरीकरणात अनपेक्षित घडामोडी घडल्या. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नक्वी ट्रॉफी घेऊन मंचावरून निघून गेले आणि ट्रॉफी भारताकडे सोपवली गेलीच नाही.


या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला आणि तिन्ही वेळा भारताने विजय मिळवला. भारताने १४ सप्टेंबर रोजी गट टप्प्यात पहिला विजय मिळवला, ज्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकड्यांशी हस्तांदोलन करण्यास टाळाटाळ केली होती.


दुसरा सामना २१ नोव्हेंबर रोजी सुपर फोर टप्प्यात झाला, ज्यात पुन्हा भारताने बाजी मारली. अंतिम सामन्यातही भारताने विजय मिळवत पाकिस्तानवर वर्चस्व सिद्ध केले. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वाधिक वेळा (९ वेळा) विजेतेपद पटकावणारा संघ आहे.

Comments
Add Comment

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा